Tuesday 30 January 2018

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 1

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 1

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 2

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 2

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 3

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 3


Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 4

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 4

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 5

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 5

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 6

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 6

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 7

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 7

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 8

Maharashtra Dinman Marathi Daily Newspaper 31 Jan 2018, Page 8

अग्रलेख.. धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?

अग्रलेख
धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?
धर्मा पाटील नावाच्या धुळे जिल्ह्यातील कुणा शेतकऱ्याने रविवारी रात्री जेजे रुग्णालयात अखेर प्राण सोडले. काय फरक पडतो आणखी एक शेतकरी देवाघरी गेला तरी? हा सगळा स्टंटच होता असा खुलासा अद्याप तरी आलेला नाही पण येऊ शकतो. शासकीय यंत्रणांनी त्यांची जमीन कवडीमोलाची नुकसानभरपाई देऊन हिरावून घेऊन खरे तर आधीच धर्मा पाटील यांचे प्राण हिरावून घेतले होते. जमीन म्हणजे शेतकऱ्यासाठी प्राणच असतो. चांगली लागती जमीन, आमराई असलेल्या या जमीनीसाठी धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये देण्यात आले होते. त्यांच्याच गावातील आणि परिसरातीलच ७५ गुंठे जमीनीला ७५ लाख रुपये भाव मिळाला होता. एकाच गावातील जमीन, एकाच प्रकल्पासाठी घेतलेली, घेणारे सरकार, महावितरण एकच पण धर्मा पाटील यांची चक्क फसवणूक झाली होती. जेव्हा ती लक्षात आली तेव्हा धर्मा पाटील यांच्या मंत्रालयात आणि महावितरणच्या दारात चकरा सुरू झाल्या. ऊर्जा मंत्र्यांचे दरवाजे त्यांनी अनेकदा खटखटवले. पण असे अनेक म्हातारेकोतारे मंत्रालयाच्या पायऱ्या चढता चढता चपला झिजवतात, त्यातलाच हा एक म्हातारा. त्याची फसवणूक करणारी यंत्रणा बलाढ्य होती, सरकार नामक दमन यंत्रणा होती. फसवणूक केल्याचे कुणीच मान्य करीना, नुकसानभरपाई देखील वाढवून मिळेना यामुळे आलेल्या आत्यंतिक नैराश्यापोटी धर्मा पाटील खचले होते. अखेर या म्हाताऱ्याने विषाचा प्याला तोंडाला लावला. मंत्रालयातच विष प्राशन केले. तरीही सरकार हलले नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येची जेव्हा बातमी झाली तेव्हा यंत्रणेला जाग आली. प्रकरण कुणाच्याच अंगावर शेकू नये म्हणून थातूरमातूर खुलासे झाले. धर्मा पाटील यांना १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे निर्लज्जपणे सांगण्यात आले. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. असे असले तरी त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला भरपाई कमी मिळाल्याचे धर्मा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हा वृद्ध शेतकरी लढत होता आणि त्याला खेटे घालायला लावत यंत्रणा त्याची क्रूर थट्टा करत होती. कुणीच ताकास तूर लागू देईना. याचा निषेध म्हणून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केले. धर्मा पाटील यांची ही कहाणी सध्या राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची आहे. भूसंपादन, तुटपुंजी नुकसानभरपाई, अधिकाऱ्यांकडून फसवणूक, दडपशाही, कर्जमाफीसाठी अविरत प्रतीक्षा अशा विविध आघाड्यांवर नाडला जाणारा शेतकरी कडेलोटाकडे ढकलला गेला आहे. तीव्र नैराश्याच्या गर्तेत भोवंडणारा हा गरीब जीव फासावर लटकवून घेत आहे. धर्मा पाटील यांची जमीन लाटली गेली पण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच तत्कालीन आमदार व एका विद्यमान मंत्र्याने प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करून, राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतली होती. धर्मा पाटील यांना मात्र विष प्राशन करावे लागले. त्यांच्यासारखेच अनेक नाडलेले, नागवले गेलेले गरीब न्यायाच्या आशेने दररोज मंत्रालयाच्या गेटवर घुटमळत असतात, चुकून आत प्रवेश मिळालाच तर इथूनतिथून धावत राहातात, लिफ्टने जायला बिचकणारे हे सर्वसामान्य जिने चढता-उतरताना थकून जातात, कुठेतरी कँटीनचा कोपरा धरून भाकरी खातात, फायलींमधले जीर्ण कागद यालात्याला मोठ्या आशेने दाखवत राहातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधुनिक, प्रगतशील महाराष्ट्रातील रयतेचे राजेच आहेत. याआधी होऊन गेलेल्या रयतेच्या राजाने गोरगरीबांच्या गवताची काडीही इकडची तिकडे करायची नाही म्हणून मावळ्यांना बजावून ठेवले होते. फडणवीससाहेब, मंत्रालयातील तुमच्या फौजेने आणि यंत्रणांमधील लुटारूंनी रयतेची अवस्था दयनीय केली आहे. त्यांना तुम्ही महाराजांप्रमाणेच धाकात ठेवायला हवे. विरोधी पक्षात असताना सामान्यांचा विश्वास तुम्ही कमावला होता. आणि आता त्यांनाच नागवणाऱ्या यंत्रणेचे तुम्ही कर्तेधर्ते म्हणून तो विश्वास तुम्ही गमावला आहे. तुम्हालाही धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा नव्हे हत्येचाच बट्टा लागला आहे. सरकारच्या उरलेल्या कालावधीत हा बट्टा पुसून काढणे हाच एककलमी कार्यक्रम राबवून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केलात तरी पुष्कळ झाले.
Who Killed Dharma Patil... Killers are in Mantralaya

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...