Tuesday 14 November 2017

पाळेमुळे सोडवून उठून जाताना...

अग्रलेख

गावखेड्यात, तिथल्या मातीत रुजलेली आपली पाळेमुळे सोडवून आयुष्याची संध्याकाळी दुसरी वाट धरायची, जिथे जन्मलो, वाढलो तिथून उठून जायचे नाईलाजाने... कसे वाटत असेल म्हाताऱ्या जीवांना? दोन दिवसांपूर्वी आमचे स्नेही आणि ज्येष्ठ पत्रकार विकास महाडिक यांनी फेसबुकवरील एका पोस्टमधून हा विषय खूप आतून मांडला. त्यांच्या आईला आणायला ते गावी गेले होते. आणि त्यांना जाणवलं ते त्यांनी फेसबुकवर व्यक्त केलं. काय जाणवलं त्यांना.. वार्धक्याकडे झुकलेल्या आईची व्यथा, नाईलाजाने गाव सोडायची वेळ आल्यामुळे डोळ्यांत आलेले अश्रू आणि त्याचबरोबर त्यांच्या आईंसारख्याच अनेक ज्येष्ठ नागरिकांचे मूक आक्रंदन. विकास महाडिक त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात – काल कोकणात गेलो होतो. आईला आणायला. 12 दिवसांपूर्वी ती गावी गेली होती. पण तिला आता कोकणात करमत नाही. कारण एकच कोकणातील घरं आता ओस पडायला लागली आहेत. अतिशय गंभीर बाब आहे. जी बाई 22 वर्षांपूर्वी हट्टाने गावी गेली. मुलांकडून घर बांधून घेतलं. तिला आता घर खायला उठतं. कारण गावात घरं आहेत पण त्यात राहायला माणसं नाहीत. सर्व सुविधा आहेत पण तिचा वापर करायला हात नाहीत. कोकणातील प्रत्येक गावात आलिशान घरे आणि मंदिरे दिसतील. पण घरांना कुलपं लटकलेली असतात. काही वर्षांपूर्वी मुंबईत आलेले चाकरमानी आता कोकणात जायला मागत नाहीत. जी गेली आहेत ती बोटावर मोजण्याइतकी. ती काय स्वमर्जीने गेलेली नाहीत. प्रत्येकाच्या बाबतीत काहीतरी ट्रॅजेडी झालीय म्हणून. कोणाची पत्नी गेली म्हणून तर कोणाची मुले सांभाळत नाहीत म्हणून. चाकरमान्यांची तिसरी-चौथी पिढी आता मुंबईत आहे. पोराबाळांच्या शिक्षणासाठी वसई, विरार, कर्जत, पनवेलला राहून दिवस काढतायेत. नोकरीसाठी पाचसहा तासांचा प्रवास करत आहेत. पण गावी जायचं नाव घेत नाहीत. गेलेच तर संध्याकाळी बेधुंद होऊन गाव फिरत राहतात. वर्षातून दोन वेळा मात्र न चुकता हा कोकणस्थ गावाकडे जातो. एक गणपती आणि दुसरी होळी. हे दोन दिवस कोकणातील 90 टक्के घरे उघडी दिसतात. ह्या दिवसात उणीदुणी आणि पार्ट्या यांना जास्त महत्व असते. घर उघडी राहणे वर्षभर होत नाही. बोलायला माणूस नाही म्हणून वय झालेली माणसं देखील इच्छा नसताना मुंबईत पळत आहेत. कोण थांबवणार ह्यांना? कोकणातील नेत्यांनी आपल्या तुंबड्या भरल्या. कोणी शेठ झाले तर कोणी राव. पण कोकणात राहावे असे वातावरण निर्माण झाले नाही. एक चांगले हॉस्पिटल कोकणात नाही की चांगल्या रस्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. मुंबईत दररोज आदळणाऱ्या लोकसंख्येच्या लोंढ्याची आपल्याला चिंता. इथे कोकण ओस पडतंय ह्याचा कोणी विचार करायचा? बघा जमतंय का विचार करून..” महाडिकांनी त्यांच्या आईच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठांच्या अंतरीची सल मांडली आहे. वर्षभर उघडी असणारी घरे आता दोनपाचच राहिली आहेत हे खरं आहे. महाडिकांचेच गाव नव्हे तर कोकणातील अनेक गावे या कुलुपबंद घरांची राखण करत असतात. गणपती, शिमग्याला कुलूप उघडले जाते, घर गजबजते, एरव्ही जळमटं धरलेल्या भिंती आनंदतात. कोकणातच कशाला राज्याच्या अनेक भागांतील गावांमध्ये हीच परिस्थिती आहे. हा खूप महत्त्वाचा विषय आहे. देशातील अनेक खेड्यापाड्यांत कमीअधिक फरकाने हीच अवस्था आहे. हे एक अस्वस्थ करणारे स्थलांतर सुरू आहे... पाळमुळं तोडून निघतायत माणसं.. न झेपणाऱ्या वयात. विकासने मांडलेले निरीक्षण अस्वस्थ करू लागले तसा त्याला फोन लावला. तो परतीच्या वाटेवरच होता. कशाला राहातील माणसं गावांत? ना रस्ते ना कुणी आजारी पडले तर त्याला योग्य उपचार मिळायला दर्जेदार वैद्यकीय सेवा.. तो तळमळीने बोलत होता. काहीतरी करायला हवे, कोकणातल्या माणसाचा पाय गावातच ठरायला हवा, असे बोलणे झाले. पण जी पिढी पोटासाठी गाव सोडून शहरांकडे स्थलांतरित झाली आहे ती मागच्यांना कुठल्या तोंडाने गावातच राहा म्हणून सांगणार? प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे आणि जगण्यासाठी दिशा शोधण्याचा हक्क आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात माणसं भरडली जात आहेत त्याचंच हे दृश्यरुप. कोकणातीलच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांत निमूट उभी असलेली बंद घरे काय सांगतात? ती घरे सांगतात, गाव, तालुका पातळीवर रोजगाराची गरज, शेती-शेतकरी जगवण्याची गरज, शेतीमालाला हमीभाव मिळण्याची गरज, भारताचा कणा असलेल्या कृषिव्यवस्थेशी निगडीत पूरक व्यवसाय, जोडधंदे तगवण्याची गरज. चांगल्या रस्त्यांची गरज. कारण रस्ते चांगले तर विकासवाटा या रस्त्यांवरून गावांत पोहोचतील आणि गावे जगतील नव्हे पुन्हा एकदा जागतील.

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०1

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०1

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०2

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०2

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०4

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०4

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०5

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०5

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०6

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०6

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०7

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०7

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०८

महाराष्ट्र दिनमान मराठी दैनिक दिनांक १५ नोव्हेंबर २०१७ पान ०८

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 1

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 1

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 2

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 2

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 3

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 3

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 4

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 4

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 5

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 5

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 6

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 6

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 7

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 7

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 8

Maharashtra Dinmaan News Paper 14-11-2017 Page 8

कुठे गेली आतड्याची ओल?

अग्रलेख
कुठे गेली आतड्याची ओल?
सोशल मीडियावर मागे एक मेसेज फिरायचा... एका भावाने दुसऱ्या भावाला का बहिणीला लिहिलेला मजकूर.. बहिण भारतात आणि भाऊ परदेशात. मजकूर साधारणपणे असा की, बाबा गेले तेव्हा मी आलो होतो पण, आता आई अत्यवस्थ आहे. मला येता येणार नाही. पण आई गेलीच तर तू सगळे विधी व्यवस्थित करून घे. आणि मुख्य म्हणजे रेकॉर्डींग कर सगळ्याचं. अगदी रडणं, अंत्ययात्रा, अंतिम संस्कार वगैरे सगळं. काही सोडू नकोस. मला सीडी पाठव. आमच्याकडे इथल्या लोकांना हिंदु रिच्युअल्सबद्दल फार उत्सुकता असते. सीडीवर कसं त्यांना सगळं दाखवता येईल एक गेटटुगेदर आयोजित करून. आईच्या चेहऱ्याचा क्लोजप घ्यायला सांग. तिरडी, मडकं, हारबीर सगळे दिसू दे नीट. याच मेसेजचा दुसरा मुखडा भावाच्या नावाने... बाबांच्या वेळी मी गेलो होतो, आता तुझी पाळी आहे. आईचं तू कर सगळं.. मला जमणार नाही... असे काळजाला हात घालणारे मेसेज वाचले की संवेदनशील मनांची उलघाल होते, अस्वस्थपणा दाटून येतो. पण तुमच्या अस्वस्थपणाला विचारतं कोण? इथे आईला जिवंतपणी स्मशानात नेऊन सोडणारा दिवटा आहे आणि बापाच्या मृत्यूची बातमी इमेलवरून कळल्यावर, मला वेळ नाही, तुम्हीच काय ते बघा, उरकून घ्या, असे उलट कळवणाराही मुलगा आहे. नगरच्या लक्ष्मीबाईंना सुनेशी पटत नाही म्हणून स्मशानात दहाव्याचे, मर्तिकाचे जेवण खाऊन दिवस ढकलण्याची वेळ आणणाऱ्या कृतघ्न मुलाची बातमी आम्ही परवा दिली होती. बायकोशी पटत नाही म्हणून या मुलाने आईची रवानगी स्मशानात केली होती. लक्ष्मीबाई एकेकाळच्या श्रीमंत, सावकारी करणाऱ्या. त्यांच्यावर दुसऱ्याच्या मर्तिकाचे जेवण जेवायची पाळी मुलाने आणली होती. त्याच्या बायकोशी पटत नाही म्हणून त्याने आईलाच स्मशानात नेऊन सोडले होते. तरीही मातेची ममता अशी की, मुलगा चांगला आहे. मला कधीमधी जेवण आणून देतो. काही दिवसच झाले मी स्मशानात राहातेय, असे लक्ष्मीबाई सांगत होत्या. प्रत्यक्षात तिथल्या गुरुजींच्या म्हणण्यानुसार त्या सहा महिने हा स्मशानवास सहन करत होत्या. त्यांची ही फरफट सोशल मीडियावरून आधी पसरली आणि नंतर प्रसार माध्यमांनीही प्रसिद्धी दिली. आता नगरच्याच माऊली सेवा प्रतिष्ठानने त्यांना आधार दिला. डॉ. सुचेता आणि डॉ. राजेंद्र धामणे यांनी लक्ष्मीबाईंना इंद्रधनू प्रकल्पात सामावून घेतले आहे. पत्नीच्या हट्टाखातर आईचे काळीज काढून नेणाऱ्या कृतघ्न मुलाच्या गोष्टीचीच आठवण अशा घटनांमुळे होत असते. हा एक दिवटा तर दुसरी घटना आणखी एका मुलाचा हृदयशून्य भाव समोर आणणारी. फोर्ट परिसरात राहाणारी एक व्यक्ती मरण पावली तर तिच्या मुलाबाळांचे पोलिसांना काही कळेनाच. ही व्यक्तीही एकटीच राहात होती. अखेर पोलिसांनी या व्यक्तीची एक भाची शोधून काढली. तिने या व्यक्तीचा मुलगा, मुलगी परदेशात असल्याची माहिती दिली. या मुलाला वडील गेल्याचे कळवल्यावर त्याचे धक्कादायक उत्तर आले, मला वेळ नाही, तुम्हीच काय ते उरकून घ्या.. भंगणाऱ्या कुटुंबसंस्थेचे हे प्रतिक मानावे तर भयचकीत व्हायला होते. याच वर्षात अंधेरीच्या लोखंडवाला संकुलातील एका मातेच्या दुर्दैवी निधनाची बातमी प्रसिद्ध झाली होती. मुलगा परदेशात आणि आई इकडे मुंबईत एकटी. आई-मुलाचा कधीतरी फोनवरून संवाद. अनेक वर्षे मुलगा भारतात फिरकलेलाच नाही. अचानक अनेक महिने आईचा फोन नाही याची त्याला आठवण होते. सुटी घेऊन तो मुंबईत येतो, लोखंडवालातील घराचे दार ठोठावतो, चावीने उघडतो तर समोरच्या बेडवर आईचा अस्थीपंजरच त्याच्या नजरेस पडतो. काय घडतंय नेमकं याचा शोध घ्यायला हवा समाजशास्त्रज्ञांनी. कुठे गेली आतड्याची ओल की मनं निबर झालीत आईबापाबद्दलही ओढ न वाटण्याइतकी. परदेशाने पायात असे कुठले दोरखंड बांधून ठेवलेत की मायेची ओलही सुकून जावी? रेप हा रेप असतो मग त्यात भेदाभेद कसा होतो? अपघात झाल्यावर मदतीला धावून जाणे हा आजवरचा सहजभाव. आता जखमी तडफडत असताना गाडीतला माल लुटला जातो, मासे, आंबे जे काही हाताला लागेल ते पळवले जाते. गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढायचे सोडून मोबाईलवर फोटो काढले जातात, व्हीडीओ घेतले जातात. काय चालले आहे हे सर्व हेच कळेनासे झाले आहे. आपल्या स्वार्थानुसार, घटनांच्या निकटतेनुसार, सोशल मीडियावर संबंधित घटना व्हायरल होण्याच्या वेगावर आपली संवेदनशीलता आताशा अवलंबून असावी अशी दाट शंका यायला लागली आहे. संवेदनशील असणे हे समाजाच्या निकोपतेचे आणि सुदृढतेचे लक्षण मानावे म्हटले तर या घटना कुठल्या कालगतीकडे बोट दाखवतात?

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...