Showing posts with label Maharashtra Dinman. Show all posts
Showing posts with label Maharashtra Dinman. Show all posts

Friday, 16 November 2018

Please Like Maharashtra Dinman Facebook Page

Follow Our Blog and Facebook Page and get fresh news on your FBWall...
https://www.facebook.com/maharashtradinman/


https://twitter.com/search?q=maharashtradinman
Maharashtra Dinman Diwali Ank, Thane Diwali Ank, Janadesh Diwali Ank, Pudhari Diwali Ank

Tuesday, 30 January 2018

अग्रलेख.. धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?

अग्रलेख
धर्मा पाटील यांची हत्या कुणी केली?
धर्मा पाटील नावाच्या धुळे जिल्ह्यातील कुणा शेतकऱ्याने रविवारी रात्री जेजे रुग्णालयात अखेर प्राण सोडले. काय फरक पडतो आणखी एक शेतकरी देवाघरी गेला तरी? हा सगळा स्टंटच होता असा खुलासा अद्याप तरी आलेला नाही पण येऊ शकतो. शासकीय यंत्रणांनी त्यांची जमीन कवडीमोलाची नुकसानभरपाई देऊन हिरावून घेऊन खरे तर आधीच धर्मा पाटील यांचे प्राण हिरावून घेतले होते. जमीन म्हणजे शेतकऱ्यासाठी प्राणच असतो. चांगली लागती जमीन, आमराई असलेल्या या जमीनीसाठी धर्मा पाटील यांना फक्त चार लाख रुपये देण्यात आले होते. त्यांच्याच गावातील आणि परिसरातीलच ७५ गुंठे जमीनीला ७५ लाख रुपये भाव मिळाला होता. एकाच गावातील जमीन, एकाच प्रकल्पासाठी घेतलेली, घेणारे सरकार, महावितरण एकच पण धर्मा पाटील यांची चक्क फसवणूक झाली होती. जेव्हा ती लक्षात आली तेव्हा धर्मा पाटील यांच्या मंत्रालयात आणि महावितरणच्या दारात चकरा सुरू झाल्या. ऊर्जा मंत्र्यांचे दरवाजे त्यांनी अनेकदा खटखटवले. पण असे अनेक म्हातारेकोतारे मंत्रालयाच्या पायऱ्या चढता चढता चपला झिजवतात, त्यातलाच हा एक म्हातारा. त्याची फसवणूक करणारी यंत्रणा बलाढ्य होती, सरकार नामक दमन यंत्रणा होती. फसवणूक केल्याचे कुणीच मान्य करीना, नुकसानभरपाई देखील वाढवून मिळेना यामुळे आलेल्या आत्यंतिक नैराश्यापोटी धर्मा पाटील खचले होते. अखेर या म्हाताऱ्याने विषाचा प्याला तोंडाला लावला. मंत्रालयातच विष प्राशन केले. तरीही सरकार हलले नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येची जेव्हा बातमी झाली तेव्हा यंत्रणेला जाग आली. प्रकरण कुणाच्याच अंगावर शेकू नये म्हणून थातूरमातूर खुलासे झाले. धर्मा पाटील यांना १५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे निर्लज्जपणे सांगण्यात आले. धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातील शेतकरी होते. धुळे जिल्ह्यात होऊ घातलेल्या औष्णिक वीज प्रकल्पात पाटील यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली होती. असे असले तरी त्यांना मात्र पाच एकराच्या बदल्यात फक्त चार लाख रुपये इतकीच भरपाई देण्यात आली. या जमिनीत आंब्याची ६०० झाडे होती. शिवाय विहीर, ठिबक सिंचन आणि वीजेचीही उत्तम व्यवस्था होती. इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याला भरपाई कमी मिळाल्याचे धर्मा पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हा वृद्ध शेतकरी लढत होता आणि त्याला खेटे घालायला लावत यंत्रणा त्याची क्रूर थट्टा करत होती. कुणीच ताकास तूर लागू देईना. याचा निषेध म्हणून पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विषप्राशन केले. धर्मा पाटील यांची ही कहाणी सध्या राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांची आहे. भूसंपादन, तुटपुंजी नुकसानभरपाई, अधिकाऱ्यांकडून फसवणूक, दडपशाही, कर्जमाफीसाठी अविरत प्रतीक्षा अशा विविध आघाड्यांवर नाडला जाणारा शेतकरी कडेलोटाकडे ढकलला गेला आहे. तीव्र नैराश्याच्या गर्तेत भोवंडणारा हा गरीब जीव फासावर लटकवून घेत आहे. धर्मा पाटील यांची जमीन लाटली गेली पण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच तत्कालीन आमदार व एका विद्यमान मंत्र्याने प्रकल्पात गेलेली जमीन खरेदी करून, राजकीय वजन वापरून तातडीने जमिनीची खातेफोडही करून घेतली होती. धर्मा पाटील यांना मात्र विष प्राशन करावे लागले. त्यांच्यासारखेच अनेक नाडलेले, नागवले गेलेले गरीब न्यायाच्या आशेने दररोज मंत्रालयाच्या गेटवर घुटमळत असतात, चुकून आत प्रवेश मिळालाच तर इथूनतिथून धावत राहातात, लिफ्टने जायला बिचकणारे हे सर्वसामान्य जिने चढता-उतरताना थकून जातात, कुठेतरी कँटीनचा कोपरा धरून भाकरी खातात, फायलींमधले जीर्ण कागद यालात्याला मोठ्या आशेने दाखवत राहातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधुनिक, प्रगतशील महाराष्ट्रातील रयतेचे राजेच आहेत. याआधी होऊन गेलेल्या रयतेच्या राजाने गोरगरीबांच्या गवताची काडीही इकडची तिकडे करायची नाही म्हणून मावळ्यांना बजावून ठेवले होते. फडणवीससाहेब, मंत्रालयातील तुमच्या फौजेने आणि यंत्रणांमधील लुटारूंनी रयतेची अवस्था दयनीय केली आहे. त्यांना तुम्ही महाराजांप्रमाणेच धाकात ठेवायला हवे. विरोधी पक्षात असताना सामान्यांचा विश्वास तुम्ही कमावला होता. आणि आता त्यांनाच नागवणाऱ्या यंत्रणेचे तुम्ही कर्तेधर्ते म्हणून तो विश्वास तुम्ही गमावला आहे. तुम्हालाही धर्मा पाटील यांच्या आत्महत्येचा नव्हे हत्येचाच बट्टा लागला आहे. सरकारच्या उरलेल्या कालावधीत हा बट्टा पुसून काढणे हाच एककलमी कार्यक्रम राबवून जनतेचा विश्वास पुन्हा संपादन केलात तरी पुष्कळ झाले.
Who Killed Dharma Patil... Killers are in Mantralaya

Thursday, 14 December 2017

लिहून देतो कर्जमाफी झाली आहे.., EDIT, Maharashtra Dinman, Farmers Karjmafi, CM, Assembly. Irrigaiton scam, Ajit Pawar

अग्रलेख
लिहून देतो कर्जमाफी झाली आहे..

शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात ऐतिहासिक कर्जमाफी झाली आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १०० रुपयांच्या नव्हे तर हजार रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून द्यायला तयार असताना काही नतद्रष्ट मंडळी त्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. फडणवीस यांनी सभागृहातही तेच सांगितले. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्याकडे १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर ज्यांची कर्जमाफी झाली त्यांची नावे लिहून द्या, अशी मागणी केली होती. त्यावर फडणवीस यांनीही आक्रमकपणे शंभर काय हजाराच्या स्टॅम्पपेपरवर लिहून देतो, असे आव्हान दिले. तरीही विश्वास दाखवायचा नाही म्हणजे कायहजाराची नोट तर मोदीसाहेबांनी कॅन्सल केली ना बे, मंग हजाराचा स्टॅम्पपेपर कुटून आणणारै भाऊ.. असेही अविश्वासू नतद्रष्ट मंडळींपैकी कुणीतरी पुटपुटल्याचं कानावर आले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रामाणिकपणे कामाला लागलेले आणि बँकांना, आयटी खात्याला व सहकारी मंत्र्यांना कामाला लावणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या कानावरही ते आले असणार. पण त्यांनी विचलित होऊ नये. काही लाख शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करायचे, कर्जमाफी करायची, खचलेल्या बळीराजाला पुन्हा त्याच्या पायावर उभे करायचे, हिंमत द्यायची, त्यासाठी हेलिकॉप्टर डगमगले तरी स्वत: न डगमगता अविश्रांत दौरे करायचे, प्रत्येक ठिकाणी कर्जमाफीची माहिती द्यायची, आकडेवारी सांगायची हे येरागबाळ्याचे काम नोहे. आणि हे काम करत असताना जाहिराती देऊन केलेल्या कामाचे पुरावे जनतेसमोर सादर करायचे याला कुणी जाहिरातबाजी म्हणत असेल तर अशी माणसे करंटीच म्हणावी लागतील. सभागृहात खुद्द मुख्यमंत्री कर्जमाफी झाली आहे सांगतात तरी राज्याच्या या नेत्यावर विरोधी पक्षांचा विश्वास नाही याला म्हणावे तरी काय? बुधवारी पुन्हा अजितदादांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला. ३१ ऑक्टोबरला तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली की ३४ हजार कोटींची कर्जमाफी झाली आहे. तशी ती खरंच झालीये का ते सांगा. स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची गरज नाही. जे उत्तर आहे ते इथे द्या”, अशी विचारणा त्यांनी फडणवीस यांना केली. आता या मंडळींना मामु फडणवीस यांनी सैराटमधील आर्चीचा प्रसिद्ध डायलॉग ऐकवण्याची वेळ आली आहे. तोच तो मराठीत सांगितलेलं कळत नाही का.. डायलॉग. फडणवीस साहेब ऐकवाच या मंडळींना तुम्ही तो डायलॉग नाहीतर कर्जमाफी झाल्याबद्दल मंगळवारी नांदेड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली  अशी जी जिल्हावार पत्रके सटासट प्रसार माध्यमांकडे पोहोचती झाली ती तरी त्यांच्या तोंडावर मारा. मगच, कर्जमाफीच्या वाटपाबाबत सरकारमध्येच एकवाक्यता नाही. सुभाष देशमुख एक सांगतात, चंद्रकांत पाटील दुसरंच बोलतात मुख्यमंत्री वेगळीच कोणतीतरी घोषणा करतात’, असे बोलणाऱ्या अजितदादांची बोलती बंद होईल. अद्याप शेतकऱ्य़ांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त जाहिराती करुन जनतेची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय’, असा आरोप करायला अजितदादा धजावतात तरी कसे? ज्या शेतकऱ्यांनी सरकारला कर्जमाफीबद्दल धन्यवाद दिल्याचे निवेदन केलेय ते दादांनी बहुदा वाचलेलं दिसत नाही. मुख्यमंत्री आणि सहकार मंत्री कर्जमाफीची आकडेवारी देताना परस्पर विरोधी माहिती देतात, असे दादा म्हणत असले तर त्यांना सिंचन घोटाळ्यातील आकडेवारीचीही आठवण करून द्यायला हवी. काही लाख कोटींची ही कर्जमाफी आहे. तपशील देताना चारपाचशे कोटी इकडेतिकडे होऊ शकतात. जनता हे समजून घेऊ शकते पण, राजकीय स्वार्थाने आंधळी झालेली विरोधी पक्षांतील नेतेमंडळी फडणवीस यांचा हे प्रामाणिक प्रयत्न समजून घेत नाहीत याचे वैषम्य कर्जमाफीबद्दल भाजपा सरकारला धन्यवाद देणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना वाटते आहे. कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे हे दिसत असतानाही नागपूरच्या थंडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळावर मोर्चा आणला. शरद पवारसाहेबांसारख्या जाणत्या राजाने सरकारशी असहकार करण्याची भाषा केली. धमक्या दिल्यात तर सरकार उलथवून टाकू... कर्जमाफी होईतो शेतकऱ्यांनी एकही वीज बील भरू नये, कर्जही फेडू नये असेही सांगितले. हा जनआक्रोश महामोर्चा विधानभवनाकडे सरकत असतानाच सिंचन घोटाळाप्रकरणी गुन्हे दाखल झाले हा निव्वळ योगायोग आहे. ही धमकी किंवा ब्लॅकमेलींग नाही हे कुणीही सांगेल. आघाडी सरकारच्या काळातील कुणा मंत्र्यावर गुन्हा दाखल झाला असता तर एकवेळ ते सुडाचे राजकारण वा धमकीचे राजकारण म्हणता आले असते. कर्जमाफीवरून वारंवार सरकारला सतावले जाते, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते म्हणून गुन्हे दाखल करून गर्भीत इशारा दिला, असेही नाही. कर्जमाफीबाबत सरकारला काहीही लपवायचे नाही की विरोधकांचा आवाजही बंद करायचा नाही हे अवघा महाराष्ट्र जाणतो.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...