Friday 21 June 2019

गोदावरी नदीतून वाहून जाणार्‍या पुराच्या पाण्याचा वापर करण्यासाठी हे धरण उपयोगी पडणार आहे.

कालवे आहेत. या धरणामुळे पाण्याचे नवे 20 साठे तयार होणार आहेत. या प्रकल्पामुळे गोदावरीमधील 180 ढचउ अतिरिक्त पुराचे पाणी येल्लामपल्ली येथील श्रीपादसागर आणि मल्लाण्णा सागर येथील प्रकल्पांमध्ये वळवता येणार आहे. जगातील सर्वात मोठे भूमिगत पंपहाऊस या प्रकल्पात बांधण्यात आल्याचं तेलंगण सरकारने स्पष्ट केलं आहे. यात महाराष्ट्र खरच कुुुुठे आहे? की आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र आणि फायदा मिळण्यासाठी तेलंगणा? जे सरदार सरोवराचे झाले तेच आता कालेश्वरम प्रकल्पाचे होत नाही ना? याची काळजी घ्यायला हवी, तशी सावधगिरी महाराष्ट्र सरकारने बाळगायला हवी. अशी काळजी घेणे यात गैर काहीच नाही. आपल्या प्रदेशातील जनतेच्या हितासाठी राज्य सरकारने हे करायलाच हवे .महाराष्ट्र सरकारनेही जनतेच्या हितासाठी ही काळजी घेणे गैर काहीच नाही.
कालेश्वरम धरणाची प्रमुख वैशिष्ट्यं सांगितली जातात ती अशी,  गोदावरीच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी या धरणामुळे मदत होणार आहे. गोदावरी नदीतून वाहून जाणार्‍या पुराच्या पाण्याचा वापर करण्यासाठी हे धरण उपयोगी पडणार आहे.
पंप हाऊसमधील पंपांद्वारे दररोज 2 ढचउ पाणी उचलले जाईल एकाच योजनेत बांधण्यात आलेला आशियातील सर्वात मोठा जलबोगदा या प्रकल्पात असेल. या प्रकल्पात एकूण 88 शक्तिशाली पंपांचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे जिवंत पाण्याचा 147.71 ढचउ पाण्याचा साठा होणार आहे. असे सांगितले जाते. तसेच महाराष्ट्राला याचा काय फायदा होईल, ते सांगितले जाते ते असे. महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश (विभाजनपूर्व) यांच्यामध्ये गोदावरीच्या पाणीवाटपाबद्दल अनेक वर्षं वाद होता. तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकारने कराराद्वारे आता गोदावरी नदीवर जलप्रकल्प बांधून शेतीसाठी लागणार्‍या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निर्णय घेतला आहे.
कालेश्वरममध्ये पाण्याचा उपसा करणारे शक्तीशाली पंप बसवण्यात आले आहेत. हे पंप एका भूमिगत पंप स्टेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. या करारानुसार तेलंगणाने कालेश्वरम प्रकल्पाच्या अंतरर्गत मेदिगड्डा येथे धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील 50 हजार एकर शेतीच्या क्षेत्राला लाभ होणार आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा यांनी पैनगंगा नदीवर चाणक-कोराटा येथे धरण बांधण्यात येणार असून त्यातील 102 ढचउ पाणी तेलंगणला वापरता येणार आहे तर 5 ढचउ पाणी महाराष्ट्र वापरू शकणार आहे.
प्रकल्प सुरु करताना संयुक्त परिषदांमध्ये खुप चांगले सांगितले जाते. प्रत्यक्षात याचा लाभ मिळतो का? सरदार सरोवराचा अनुभव महाराष्ट्रासाठी चांगला नाही. यामुळे कालेश्वरम प्रकल्पाचा अनुभव तसा असू नये अशी अपेक्षा ठेऊया.

भले तर देऊ कासेची लंगोटी

भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळांच्या माथी हाणू काठी तुकोबारायांचा या अभंगातील ओळ, 350 वर्षांनंतरही अजुनही राजकीय आणि सामाजिक स्थिती तशीच ...